talathi5000-postsrecruitment-2020 तलाठ्यांची (५ हजार रिक्त पदे) भरती 2020.

talathi5000-postsrecruitment-2020 तलाठ्यांची (५ हजार रिक्त पदे) भरती 2020.

Talathi (5000 Posts) Recruitment 2020 Details

गाव देतोय तलाठ्याला हाक ; तलाठी घालतोय शासनाला साद…
सांगली – शासनाने तलाठी पदांची भरती केली नसल्याने राज्यात सुमारे पाच हजार पदे रिक्त आहेत. सात-बारा उतारा, नोंदीसह विविध कामांचा ताण सध्या तलाठ्यांवर वाढला आहे. परिणामी, शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास, योजनांशी निगडित कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तलाठ्यांची भरती कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
Talathi (5000 Posts) Recruitment 2020
नवीन सजांसाठी तलाठी पदांची भरती रखडली
राज्यात तलाठ्यांची १२ हजार ६३६ पदे आहेत. त्यापैकी १० हजार ३४० कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडविण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत.
Talathi(5000 Posts)Recruitment 2020
शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांनाच करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे कामदेखील तलाठ्यांकडे येणार आहे. महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांची कामे रखडलीत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात.
तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त:
शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली आहे.
सन २०१६  ते २०१९ दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.
तीन वर्षांपासून पदभरती ठप्प
राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने तीन हजार १६५ नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदांच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होईल. त्यात तीन हजार १६५ पदांना मंजुरी देण्यात आली. दरवर्षी २० टक्क्यांप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.
राज्यातील तलाठी
तलाठी संख्या – १२ हजार ६३६
कार्यरत तलाठी – १० हजार ३४०
रिक्त पदे – २ हजार २९६
दृष्टिक्षेपात आकडे
नव्याने तयार झालेले सजे – ३ हजार १६५
नवीन सजेसाठी तलाठी पदे – ३ हजार  १६५
नवीन मंडलाधिकारी पदे – ५२८
मंडलाधिकारी पदे
एकूण पदे – २१०६
रिक्त पदे – १९०
आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी २० टक्‍क्‍यांप्रमाणे भरणार, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, पदभरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत.

Age Limit

Talathi Bharti 2019 New Rules Age Limit Details are given below. Also the Age relaxation updates & Details are given here. Read Following updates & Details are given here.
Age Limit For Talathi Bharti 2020
Open Category18 to 38 Years
Reserved Category18 to 43 Years
Projected / Earthquake Affected Candidates18 to 45 Years

Fees Details

Talathi Bharti 2020 Examination Fees Details are given below.
Talathi Bharti 2019 Examination Feed Details

Written Exam Pattern

तलाठी Bharti 2019 Examination patter is given below As per the Rules New Talathi Bharti written Examination is conducted For 200 Marks. There will be total 100 Question in Examinations. More Details about Talathi bharti Examination are given below.
Talathi Bharti 2019 Exam Pattern
Talathi Exam 2020 Examination Paper Pattern
SubjectsQuestionsMarks
Marathi2550 Marks
English2550 Marks
General Knowledge2550 Marks
Mathematics2550 Marks
TOTAL100 Questions200 Marks

Post a Comment

0 Comments